शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११

तिची डायरी......

कधी कधी असं वाटत की काही करुच नये,काही लिहु नये,कोणाशी बोलु नये,काही क्षण आपल्यासाठी घालवावेत,जरा स्वस्त बसावं,शांततेत!ती तिच्य डायरी मध्ये लिहित होती.कॉलेजच्या सेकंड इयरला असुनही तिच्याकडे बघुन कधी अस वाटल नाही की ही कॉलेज मध्ये असेल.सगळेजण नेहमी म्हणायचे तिला की वयापेक्षा मोठी दिसतेस तु.ती फक्त हसायची,कारण त्या पलिकडे त्या गोष्टीवर रिअक्ट होण्यासारख काहिच नव्हतं. तिचे विचार फार प्रगल्भ होते असही नाही पण कदाचित इतर मुलींसारख नॉर्मल वागाव अस तिला कधीच वाटल नाही.कदाचित आयुष्याकडे फार त्रोटकपणे बघत असावी ती.तिचं वर्णन कराव असही कधी कोणाला वाटल नाही किंवा तिने मिळवलेल्या यशाबद्दल खुप कौतुक कराव असही कधी कोणाला वाटल नाही.पण तिच्या यशाबद्दल तिने मिळवलेल्या कतृत्वाबद्दल ती आपल्या डायरीत अगदी सविस्तर पणे लिहुन ठेवायची.जांभळ्या रंगाची,त्यावर फुलांची छान नक्षी असलेली ती डायरी तिने आपल्या वाढदिवसाला खास घेतली होती.पण घेताना एक काळजी मात्र घेतली होती हं तिने,त्या डायरीवर डेट नावाचा प्रकार नव्हता.माझ्या मनातल लिहिण्यासाठी मला तारखेची अडगळ नकोय तिने आर्चिसच्या बॉयला ठासुन सांगितल.तेव्हा तिचं वय साधारण १४-१५ च्या आसपास असावं.सहा वर्ष झाली ती अजुनही त्याच डायरीत लिहिते.कधी मध्येच वाटल तर मागची पान चाळते.पण वाचायच कटाक्षाने टाळते.तिच्यासाठी आज मी डायरीत काय लिहील आहे हे महत्त्वाच कारण.आजचा दिवस शांततेत घालवावसा तिला वाटत होतं.कारण त्याला कारणही तसच होतं.आत्तापर्यंत फक्त तिच्याच असणार्‍या गोष्टींमध्ये तिची डायरी होती पण त्यात आता अजुन कोणीतरी  add  झालेलं होतं अस म्हणुया आपण.आज त्यांच्या मैत्रीला एक वर्ष पूर्ण झालं होतं,आणि एक वर्षात घडुन गेलेल्या गोष्टींचा मागोवा घ्यावा अस तिला वाटत होत.सकाळी  त्याला ११ला भेटण्याची वेळ तिने दिली होती.रात्री १२ वाजल्यापासुनच ती त्याला भेटायला उत्सुक होती त्यामुळे तिला निटशी झोपही लागली नव्हती.त्यांच्या ह्या खास दिवशी त्याला काय भेट द्यावी ह्याचा ति खुप विचार करत होती.एखादा टी-शर्ट अं... नको,एखादा मग ज्यावर खुप छान अस क्वोट असेल,पण नको ते स्पेशल ठरणार नाही.मग आता? आणि हे सगळ डायरीत लिहित असताना तिला एकदम सुचलं.अरे वा!हे खुपच स्पेशल ठरेल!जी गोष्ट फक्त माझी होती ती मी देणार म्हणजे .......खुपच मस्त.सुचलेल्या त्या स्पेशल गिफ्टवर तीच खुप फिदा झाली होती आणि कधी एकदा देतेय अस होउन गेलं होतं तिला.त्याला भेटण्याच्या आधी शेवटच डायरीत लिहुन घ्याव म्हणुन ती डायरी लिहायला बसली.
Dear Dairy,
                    कधी कधी असं वाटत की काही करुच नये,काही लिहु नये,कोणाशी बोलु नये,काही क्षण आपल्यासाठी घालवावेत,जरा स्वस्त बसावं,शांततेत!खर तर अस कधीच नव्हत वाटल गं,पण आज ते वाटतय ह्याला कारणही तसच आहे.आज आम्हाला वर्ष पूर्ण झाल.काय काय घडलय ह्या एका वर्षात ह्याचा विचार करताना खुप मस्त वाटतय.आपली एखादी हरवलेली वस्तु मिळाल्या नंतर जो आनंद होतो ना तस काहीस झालय माझं.तो खरच आहे ग तसा.खुप काळजी घेतो माझी.(आत्ता पर्यंत हे वाक्य १५० वेळा डायरीत येउन गेलय पण तरी....)आज मी मुद्दाउन आधीची सगळी पान वाचली.परत वाचायला मिळतील नाही मिळणार.खुप फरक पडलाय!हो,आधी पेक्षा जास्त मोठी झालेय मी पण त्याला पर्याय नाही.आधी फक्त मी माझीच होते पण दुसर्‍यासाठी काहीतरी होण ह्याने खुप बर वाटत!आपल्या गोष्टींमुळे,आपल्या सुख-दु:खांमुळे कोणाला तरी फरक पडतोय हे पहाताना खुप बर वाटत.आधी कधी अनुभवच आला नव्हता ना असा पण आता तो येतोय त्यामुळे त्याचं अप्रुप जास्त आहे.आज ११ला भेटणार आहे मी त्याला!नवीन ड्रेस घालुन जाणार आहे.मस्त कुठेतरी जेउ.भटकु.मजा करू!बस अजुन काय ? आज त्याला मी मोठ गिफ्ट देणार आहे.तुलाही सरप्राईज असेल ते! घाबरू नकोस!एवढ काही खास नाहीये पण तरी......हल्ली माझं लिहीण खुप कमी होतय!हं........राहुदे!तु रागवु नकोस फक्त!नेहमी आणि माझ्या बरोबर रहा.चल मी आवरते.बाय.......                    

                                                                                                                                                                              तुझीच

P.S. :-तुला निट रॅप करून त्याच्याकडे देयच आहे कायमसाठी!माझी आठवण काढ.आणि निट रहा.काळजी घे.तो सुद्धा आपलाच आहे.राहशील ना?त्याच्याशी बोलताना काही राखुन ठेवु नकोस.तो खुप काळजी घेईल तुझी.(तुझी खुशाली त्याच्याकडुन घेत राहीन)बाय.मी मिस करेन तुला.तु  सर्वस्व आहेस आणि आज मी ते माझ्याच सर्वस्वाकडे देतेय.

बुधवार, २ फेब्रुवारी, २०११

मला सापडलेली कविता.........

(मला सापडलेली ही कविता माझ्या बहिणीच्या कप्प्यात होत,कविता ज्या पद्धतीने लिहिली गेली होती त्यावरुन तिच वय फार मोठ वाटत पण ती फक्त १२ वर्षांची आहे.ही कविता मला खुप भावली,ती फक्त तिची आहे म्हणुन नव्हे तर त्यातला आशय तिच्या वयाच्या मानाने फार मोठा आहे.म्हणुन मला सापडलेली तिची ही कविता......)
 दु:ख
एखादं कोणीतरी असतं
जे आपल्याला दुरून दिसत असतं
गुलाबाच्या काट्याप्रमाणे
हळुच कोणीतरी टोचत असतं
एखादा भावस्पर्श होतो.
कोणीतरी पटकन निघुन जातं
असं वाटत सारं जगच आपल्याला सोडुन गेलयं
कोणीतरी रडत असतं,पण एकु येत नसत.
पटकन कोणीतरी भेटुन जात
आपला सुगंध बरोबर देऊन जातं.
अचानक सगळच नष्ट होतं
अचानक रडण्याचा आवाज येतो
पण कोणाचच लक्ष नसतं
तो/ती असते/असतो
मी एकटीच कुठेतरी फिरत असते.....
                                              -मयुरा आपटे.

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

ती दोघं.........

                         आमच्या वाड्याच्या समोर एक छोट बैठ घर आहे.छान लाकडाचं काम असलेलं,पडवीत झोपाळा,मोठ अंगण,कौलारू जरा जुनाट बांधणीचं घर आहे.तिथे पूर्वी एक वयोवृद्ध जोडपं रहायच.आमच्यासाठी ते अप्पा आणि आजीच होते.त्यांना मुल नव्हतं त्यामुळे आम्हीच त्यांची मुलं,नातवंड,जिवलग मित्र होतो.त्यामुळे आजीच्या लाडाला पण ऊत यायचा.ती दोघ आम्हाला घरच्यांपेक्षा जास्त जवळची वाटायची.दिवस रात्र आम्ही त्यांच्या पडीक असायचो तरीही ओरडण नाही की काही नाही.त्यांच्या घरासमोर मोठं अंगण होतं आणि त्याला लागुनच सागाच्या लाकडातला मोठा झोपाळा होता.त्यावर बसुन अप्पा आम्हाला गोष्टी सांगायचे.मग आजीने केलेल्या खोबर्‍याच्या वड्या,वाळत घातलेल्या चिकोड्या,गुळ-खोबर  हाच आमचा खुराक.मे महिन्यात तर खाऊला अगदी ऊत यायचा.आंबा पोळी,फणस पोळी,आमरस आणि काय  काय मजा असायची.आमचा दुपारचा वेळ पत्ते खेळण्यात आणि संध्याकाळी लपाछपी,पकडापकडी आणि बरोबर चमचमीत खायला काहीतरि असा एकुण जात असे.परिक्षेच्या वेळेला मुद्दाऊन आजी-अप्पांकडे अभ्यासाला जायचो.कारण अप्पा गणित फार छान शिकवायचे तर आजी संस्कृत.अप्पा हसत-खेळत शिकवायचे,तर आजीचा धाक मात्र तेवढाच होता.उद्या देव पाठ झाला पाहिजे म्हटल्यावर तो व्हायचाच!परिक्षेचा रिझल्ट घेऊन घरी गेलो की आमच्यासाठी खास खरवसाचा बेत असायचा.
                          आज ते घर पाहिलं की हे सगळ आठवतं!त्या बाहेरच्या झोपाळ्यावर बसुन आम्ही मोठ मोठ्याने रामरक्षा,मारुती स्तोत्र म्हणलीयेत,अप्पांचा आवाज अगदी खर्जातला लागायचा तो एकताना मन अगदी मन गुंगुन जायचं.सकाळी शाळेत जाताना अप्पा झोपाळ्यावर पेपर वाचत बसलेले दिसायचे.आतुन आजी मात्र त्यांना "अहो,अंघोळ उरकून घ्या!" अस म्हणत असायची.हे नेहमीच ठरलेल होतं.आणि ते एकल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नसे.
                           आजी गेल्यापासुन अप्पांनी झोपाळ्यावर बसायचच सोडुन दिलय,चाक निखळुन रथ कोलमडावा तसं त्यांचं झालं होतं.सतत घरात काहीतरी शोधत असतात.हळुहळु आमच ही जाण कमी होत गेलं ,पण मी खास वेळ काढुन भेटायला जातेच!हल्ली बघवत नाही त्यांच्याकडे.आयष्याची संध्याकाळ अशीच असते असं मला सांगत रहातात.निदान मांणसांची ओळख विसरलेले नाही हेच माझ्यासाठी खुप होतं.ते दिवसभर काय करतात,त्यांच्या जेवणा-खाण्याचं काय करतात,तब्येत कशी आहे असे काळजीने प्रश्न विचारणारे खुप होते,पण त्यांनी जगापासुन स्वतःला पूर्ण पणे वेगळ करुन घेतल होतं.
                         आता त्या घराकडे पाहिलं की मन उदास होतं,कारण त्या घरातली ती दोघ मला दिसत नाहीत,झोपाळ्याच्या गंजलेल्या साखळ्यांची करकर तेवढी एकु येते.