(मला सापडलेली ही कविता माझ्या बहिणीच्या कप्प्यात होत,कविता ज्या पद्धतीने लिहिली गेली होती त्यावरुन तिच वय फार मोठ वाटत पण ती फक्त १२ वर्षांची आहे.ही कविता मला खुप भावली,ती फक्त तिची आहे म्हणुन नव्हे तर त्यातला आशय तिच्या वयाच्या मानाने फार मोठा आहे.म्हणुन मला सापडलेली तिची ही कविता......)
दु:ख
एखादं कोणीतरी असतं
जे आपल्याला दुरून दिसत असतं
गुलाबाच्या काट्याप्रमाणे
हळुच कोणीतरी टोचत असतं
एखादा भावस्पर्श होतो.
कोणीतरी पटकन निघुन जातं
असं वाटत सारं जगच आपल्याला सोडुन गेलयं
कोणीतरी रडत असतं,पण एकु येत नसत.
पटकन कोणीतरी भेटुन जात
आपला सुगंध बरोबर देऊन जातं.
अचानक सगळच नष्ट होतं
अचानक रडण्याचा आवाज येतो
पण कोणाचच लक्ष नसतं
तो/ती असते/असतो
मी एकटीच कुठेतरी फिरत असते.....
-मयुरा आपटे.
दु:ख
एखादं कोणीतरी असतं
जे आपल्याला दुरून दिसत असतं
गुलाबाच्या काट्याप्रमाणे
हळुच कोणीतरी टोचत असतं
एखादा भावस्पर्श होतो.
कोणीतरी पटकन निघुन जातं
असं वाटत सारं जगच आपल्याला सोडुन गेलयं
कोणीतरी रडत असतं,पण एकु येत नसत.
पटकन कोणीतरी भेटुन जात
आपला सुगंध बरोबर देऊन जातं.
अचानक सगळच नष्ट होतं
अचानक रडण्याचा आवाज येतो
पण कोणाचच लक्ष नसतं
तो/ती असते/असतो
मी एकटीच कुठेतरी फिरत असते.....
-मयुरा आपटे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा